'...पाठ दाखवून गेले सज्जन'; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर तिखट पलटवार, पाहा व्हिडिओ

Aadhaar.
Aadhaar.

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi)गुरुवारी लोकसभेत शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी लोकसभेत राहुल गांधींवर हल्लाबोल केला. इराणी यांनी त्यांच्यावर खोटं बोलण्याचा आणि संसदेचा सन्मान न केल्याचा आरोप केला आहे.  

स्मृती इराणी यांनी संसदेत दिलेल्या भाषणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, बजेटमधील बस सुविधेचा विकास करण्याच्या तरतुदीवर चर्चा करण्याऐवजी सज्जनांनी गेल्या ३० वर्षात अमेठीमध्ये एक बस स्थानक सुद्धा बनवलं नाही. त्यांच्या चार पीढीने अमेठीच्या जनतेला केवळ स्वप्न दाखवले, दुसरीकडे मोदींच्या कार्यकाळात रस्ते आणि रेल्वे मार्गांचे जाळे पसरवण्यात आले. 

हेलिकॉप्टरसाठी राष्ट्रपतींकडून हवंय कर्ज; महिलेच्या मागणीने गाव अचंबित

केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत म्हटलं की, सज्जन पाठ दाखवून गेले. बस सेवा चांगली करण्यासाठी १८,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यांनी बस सुविधा चांगली करण्यावर चर्चा केली नाही. सत्य हे आहे की अमेठीमध्ये ३० वर्षात एकही बस स्थानक बनलं नाही. चर्चा करा. दूध का दूध आणि पाणीचे पाणी होईल. बजेट देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आहे. कृषी कायदे संसदेत मंजूर झाले आहेत. मग त्यांना काळे कसे म्हणता येईल. 

स्मृती इराणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना म्हणाल्या की, देशात जेव्हा कोरोना महामारी आली तेव्हा मोदींनी देशातील कोणताही व्यक्ती उपाशी झोपू नये याची चिंता केली. गरिब कल्याण पॅकेजच्या माध्यमातून  आठ महिन्यात ८० कोटी लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्यात आले. ज्या लोकांना अन्न मिळाले त्याताली ३.१८ लाख अमेठीचेपण होते. पण, राहुल गांधींना याचे काही पडले नाही.

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला संसदेत धारेवर धरलं होतं. राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषणावेळी कृषी कायद्यांमुळे केवळ धनदांडग्यांचा फायदा होत असल्याचं म्हटलं. तसंच मोदी सरकार हे हम दो हमारे दो असून फक्त चारच लोक देश चालवत असल्याचंही ते म्हणाले होते. राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर काहीच भाष्य केलं नाही. ते म्हणाले की, विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनावर चर्चेची मागणी केली होती. सरकारने ही मागणी मान्य केली नाही. सरकारने म्हटलं की, फक्त अर्थसंकल्पावर आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होईल. यासाठी सरकारच्या या निर्णयाचा मी विरोध करत असून अर्थसंकल्पावर काहीच भाष्य करणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com