Rahul Gandhi : मी 'त्या' दोन मुद्द्यांवर बोललो अन् बदनामी...; राहुल गांधींनी व्यक्त केली खदखद

Rahul Gandhi congress
Rahul Gandhi congress sakal

नवी दिल्ली - भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ते म्हणाले की, जेव्हा ते राजकारणात आले तेव्हा 5-6 वर्षांनंतरपर्यंत माध्यमं त्यांचं कौतुक करायचे. हे २००८-०९ पर्यंत कायम होता. पण त्यानंतर त्याचं मत बदललं. ज्या मुद्दांमुळे प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर 24 तास टीका करण्यास सुरुवात केली, त्याविषयी राहुल गांधी स्पष्टच बोलले. शिवाय आपली प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केल्याचं राहुल म्हणाले.

Rahul Gandhi congress
Mumbai : पॉवर कम ट्रॅफिक ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम

राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा मी नियामगिरी आणि भट्टा परसौलच्या मुद्द्यावर उघडपणे बोललो. तेव्हापासून मीडियाने माझ्यावर हल्लाबोल केला. दिवसरात्र माझ्यावर टीका करण्यास सुरुवात केली. मी केवळ गरिबांच्या हक्काची गोष्ट केली. हे दोन्ही मुद्दे देशातील दलित लोकांच्या हिताशी निगडित होते.

हेही वाचा Swasthyam 2022: प्राणायाम करताना या सात गोष्टी लक्षात ठेवा

राहुल म्हणाले की, संविधानानुसार जी संपत्ती वेगवेगळ्या राजांकडे होती ती आम्ही गरीब जनतेला दिली. पण भाजप मात्र उलट करत आहे. गरीब लोकांची सर्व संपत्ती हिसकावून राजा-महाराजांकडे परत पाठवण्यात ते मग्न आहेत. भाजप सातत्याने माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे. पण सत्य कधीच लपत नाही हे वास्तव आहे. कुठूनतरी बाहेर येण्याचा मार्ग बनवतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com