'सत्तेत आल्यास निमलष्करी दलातील जवानांनाही हुतात्म्याचा दर्जा'

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तेत आल्यास लष्करामुळे निमलष्करी दलातील कर्तव्य बजाविताना मृत्यू झालेल्या जवानांना हुतात्म्याचा दर्जा देणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत विविध विषयांवर भाष्य केले. शिक्षा, दिशा आणि दशा असे या कार्यक्रमाचे नाव होते. गेल्या पाचवर्षांत शिक्षण श्रेत्राच्या तरतूदीत मोठ्या प्रमाणात कमतरता करण्यात आल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. या कार्यक्रमाच्या सुरवातीला पुलवामात दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

राहुल गांधी म्हणाले, की सरकारने अधिकाधिक विद्यापीठांची निर्मिती करून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज सहज मंजूर केले पाहिजे. गेल्या पाचवर्षांत हे होऊ शकलेले नाही. शिक्षणावर सरकारने केलेल्या खर्चात खूप मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणुकीचीही गरज आहे. देशात शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, फक्त मोजक्या उद्योगपतींचे कर्जमाफ करण्यात आले आहे. आज देशात फक्त 15 ते 20 लोकांसाठी सर्वकाही केले जात आहे. आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ. हिंसा ही कोणत्याही प्रश्नाचा मार्ग असू शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक एकामागून एक विद्यापीठात बसविले जात आहेत. त्यांचे फक्त विचारधारेशी देणेघेणे आहे, विद्यार्थ्यांशी नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com