
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर’च्या अनुषंगाने केंद्र सरकारवर टीका करत असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर आज पुन्हा एकदा शरसंधान साधले. ‘भारताला पाकिस्तानसोबत का जोडले गेले? पाकिस्तानची निंदा करण्यात भारताला एकाही देशाने का साथ दिली नाही? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी करण्यास कोणी सांगितले?’, अशी प्रश्नांची सरबत्ती करत गांधी यांनी भारताचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे विफल ठरल्याचा आरोप केला आहे. जयशंकर यांना प्रश्न विचारत असताना गांधी यांनी त्यांचा उपहास ‘जेजे’ असा केला.