पाटणाः देशभरातल्या विरोधकांची आज पाटण्याच बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. विरोधकांची मोट बांधून भाजपला शह देण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, भारतात विचारधारेची लढाई सुरु आहे. एकीकडे काँग्रेसची भारत जोडोची विचारधारा आणि दुसरीकडे भाजप-आरएसएसची भारत तोडो वाली विचारधारा. कॉंग्रेस पक्षाचा डीएनए बिहारमध्ये आहे, बिहारचे लोक भारत जोडो यात्रेत माझ्यासोबत होते. भाजप भारताला तोडण्याचं काम करत आहे तर काँग्रेस पक्ष देशाला जोडण्याचं प्रेम देण्याचं काम करत आहे.
''द्वेषाला द्वेषाने उत्तर कधीच होऊ शकणार नाही.. द्वेषाला प्रेम हेच उत्तर असणार आहे. आज सर्व विरोधी पक्षाचे नेते भाजपला हरवण्यासाठी एकत्र आले आहेत. मी आज या स्टेजवरून सांगतो, तेलंगना, छत्तीसगढ,राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येणार आहे.'' असा विश्वास शेवटी राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आयोजित बैठकीसाठी महाराष्ट्रातून शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, भगवंत मान, राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे हे नेते उपस्थित आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.