INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

Rahul Gandhi and Tejashwi Yadav: तब्बल १३०० किमीचा प्रवास, राहुल गांधी, तेजस्वी यादव यांच्यासह अनेके नेते सहभागी होणार
Rahul Gandhi and Tejashwi Yadav addressing supporters at the launch of INDIA Alliance Voter Rights Yatra in Bihar.
Rahul Gandhi and Tejashwi Yadav addressing supporters at the launch of INDIA Alliance Voter Rights Yatra in Bihar.esakal
Updated on

INDIA Alliance launch Voter Rights Yatra in Bihar: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधी आघाडी 'इंडिया' आघाडीतील इतर अनेक घटक पक्षांचे नेते बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सुधारणा (SIR) आणि कथित 'मत चोरी' विरोधात १७ ऑगस्टपासून 'मतदार हक्क यात्रा' सुरू करणार आहेत. हा प्रवास सासाराम येथून सुरू होईल आणि १ सप्टेंबर रोजी पाटणाच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर 'मतदार हक्क रॅली' ने संपणार आहे.

इंडिया आघाडीचे राष्ट्रीय पातळीवरील नेते या जाहीर सभेत सहभागी होतील. या यात्रेचा प्रवास औरंगाबाद, गयाजी, नवादा, नालंदा, शेखपुरा, लखीसराय, मुंगेर, भागलपूर, कटिहार, पूर्णिया, अररिया, सुपौल, मधुबनी, दरभंगा, सीतामढी, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, गोपालगंज, सिवान, छपरा आणि आरा असा असणार आहे.

तर  राजद नेते तेजस्वी यादव यांनी मतदार हक्क यात्रेबद्दल सांगितले की, आम्ही उद्या(रविवार) सासाराम येथून 'मतदार हक्क यात्रा' सुरू करत आहोत. उद्या आम्ही सर्वजण महाआघाडीतील मित्रपक्षांसोबत असू. आम्ही अनेक जिल्ह्यांना भेट देणार आहोत आणि लोकांना जागरूक करण्याचा आमचा प्रयत्न असेल जेaoणेकरून कोणत्याही मतदाराचे नाव वगळले जाऊ नये.

Rahul Gandhi and Tejashwi Yadav addressing supporters at the launch of INDIA Alliance Voter Rights Yatra in Bihar.
Neeraj Chopra Wife: 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची पत्नी हिमानीने घेतला धाडसी निर्णय; दीड कोटींचं पॅकेज नाकारलं अन् टेनिसलाही अलविदा, कारण आता...

तसेच तेजस्वी यादव म्हणाले, "राहुल गांधी सासारामच्या भूमीपासून प्रवास सुरू करतील, अनेक दिवस आमच्यासोबत राहतील, आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांना सांगू की त्यांची मते कशी चोरीला जात आहेत. हा प्रवास एक ऐतिहासिक प्रवास असेल."

तत्पूर्वी, काँग्रेस मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी पत्रकारांना सांगितले की, "स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेणे शक्य आहे कारण आपल्याकडे मतदानाचा अधिकार आहे. राहुल गांधी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी संघर्ष सुरू केला आहे."

Rahul Gandhi and Tejashwi Yadav addressing supporters at the launch of INDIA Alliance Voter Rights Yatra in Bihar.
India reaction on Trump-Putin meeting : ट्रम्प-पुतीन यांच्या भेटीवर भारताची पहिली प्रतिक्रिया; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, 'केवळ संवाद...'

तसेच ते म्हणाले, ''जेव्हा आमचे इंडिया आघाडीचे सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे अपील केले तेव्हा सर्वोच्च न्यायालयालाही हस्तक्षेप करावा लागला. हे षड्यंत्र केवळ मते हिसकावण्याचे नव्हते. ते तुमची आणि आमची ओळख हिसकावण्याचे षड्यंत्र होते.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com