मोरांनी केले शेतीचे नुकसान; विष देऊन घेतला 23 मोरांचा जीव

crime
crime

बिकानेर : राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील सेरूना गावात मोरांना शेतीचे मोठे नुकसान केल्याने शेतकऱ्याने विष देऊन 23 मोरांना मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, शेतकऱ्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी दिनेशसिंह चामर याने आपल्या शेतीचे नुकसान केल्याने त्याने हे कृत्य केले. त्याने विषामध्ये बुडवून बियाणे आपल्या शेतात ठेवली. ती बियाणे खाल्यानंतर सुमारे 23 मोरांचा तडफडून मृत्यू झाला आहे. तपासणीदरम्यान शेतामध्ये सापडलेल्या बियाणांत विष आढळून आले आहे.

गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. 23 मोरांसह काही कोंबड्या आणि उंदिरही बियाणे खाल्याने मृत्यू झाला आहे. या शेतकऱ्यांना वन्यजीव कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. वन अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com