"गलवान खोऱ्यात २-४ नव्हे तर ३८-५० चिनी जवान मारले गेले"

आमच्या लष्कराने पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद्यांचा कसा खात्मा केला ते सर्वांनी पाहिले - संरक्षण मंत्री
Rajnath Singh
Rajnath Singhटिम ई सकाळ

मागील दोन महिन्यांपासून सीमाप्रश्नावरून भारत-चीनचा (India China) वाद कायम आहे. चीनने पुन्हा सीमेवर कारवाया करायला सुरुवात केल्याने सीमावर्ती भागात तणाव वाढला आहे. यावर काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी गलवान खोऱ्यातील चीन-भारत संघर्षाबद्दल प्रतिक्रीया देत फक्त 3 चिनी जवान मारले गेल्याची माहिती दिली होती. यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी फक्त 3 जवान नसून 38-50 चिनी जवान मारल्याचे स्पष्ट केले आहे. ते बलदेवमध्ये बोलत होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “राहूल गांधी जे काही वाचले त्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी सांगितले की फक्त 3 चिनी जवान मारले गेले. मात्र मी स्पष्ट करू इच्छितो, ऑस्ट्रेलिया-आधारित वृत्तपत्रानुसार, 2-4 नव्हे तर 38-50 चिनी जवान मारले गेले”

Rajnath Singh
मनीष तिवारी म्हणाले, ...तर मला सुखद आश्चर्य झालं असतं

“याआधी आम्ही दिलेली माहिती गांभीर्याने घेतली नाही, पण आज भारत कमकुवत नाही; आपण काही बोललो तर सारे जग ऐकते. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर आमच्या लष्कराने पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद्यांचा कसा खात्मा केला ते सर्वांनी पाहिले.” आम्ही मजबूत संदेश दिला, असेही मंत्री राजनाथ सिंह म्हणाले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com