Rajnath Singh Rajya Sabha Speech: '..तर आम्ही पाकिस्तानला मदत करण्यास तयार आहोत', राजनाथ यांचं राज्यसभेत मोठं विधान!

Rajnath Singh on Pakistan : ''ऑपरेशन सिंदूर सध्यासाठी थांबवण्यात आले आहे, परंतु जर...'' राजनाथ सिंह यांनी असंही बोलून दाखवलं आहे.
Union Minister Rajnath Singh addresses Rajya Sabha, stating India’s readiness to assist Pakistan in controlling terrorism—a significant geopolitical statement.
Union Minister Rajnath Singh addresses Rajya Sabha, stating India’s readiness to assist Pakistan in controlling terrorism—a significant geopolitical statement. esakal
Updated on

Rajnath Singh’s Bold Statement in Rajya Sabha :  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज(मंगळवार) राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू केली. ज्यासाठी १६ तासांचा वेळ देण्यात आला आहे. राजनाथ सिंह यांनी एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ठार मारल्याबद्दल सुरक्षा दलांचे कौतुक केले  आणि म्हटले,‘’आमच्या सैनिकांनी पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे नष्ट केले, तेही एकही नागरिकांचा जीव न गमावता. हे भारताच्या ताकदीचे आणि धाडसाचे पुरावेत आहे. 

तसेच राजनाथ सिंह यांनी सांगितले की, जर पाकिस्तानला त्यांच्या देशातील दहशतवादावर नियंत्रण ठेवता येत नसेल. तर भारत त्यांना मदत करण्यास तयार आहे. तसेच राजनाथ सिंह यांनी यावर भर दिला की, भारताला पाकिस्तानमधून दहशतवाद संपवायचा आहे. कारण तो संपूर्ण जगासाठी धोका आहे. मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेची एक नवीन धोरण स्वीकारले आहे.

याप्रसंगी बोलताना राजनाथ सिंह यांनी केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर चीन आणि इतर शत्रूंनाही टोला लगावला. ते म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरने केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर त्याच्या समर्थकांनाही स्पष्ट संदेश दिला आहे." तर राजनाथ सिंह यांनी असंही स्पष्ट केलं की ऑपरेशन सिंदूर सध्यासाठी थांबवण्यात आले आहे, परंतु जर पाकिस्तानने पुन्हा काही चूक केली तर भारत ते पुन्हा सुरू करण्यास मागेपुढे पाहणार नाही.

Union Minister Rajnath Singh addresses Rajya Sabha, stating India’s readiness to assist Pakistan in controlling terrorism—a significant geopolitical statement.
Owaisi on Ind vs Pak Cricket match: भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचवरून आता ओवैसीचा संसदेत मोदींना सवाल, म्हणाले..

याशिवाय राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारत आता शांतपणे सहन करणारा देश नाही. आम्ही दाखवून दिले आहे की आम्ही एक शक्तिशाली राष्ट्र आहोत. त्यांनी असा विश्वासही व्यक्त केला की, एक दिवस येईल जेव्हा पीओकेमधील लोक भारताच्या शासनव्यवस्थेचा भाग असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com