नवी दिल्ली : वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या 55 जागा पुढील महिन्यात रिक्त होत आहेत. अलिकडच्या काळातील विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांना मिळालेले यश पाहता या सभागृहात बहुमताची जुळवाजुळव करणं सत्ताधारी भाजपला जड जाणार असल्याचे चित्र आहे.
गेल्या दोन वर्षांत विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या सत्तेला लागलेली ओहोटी आणि प्रादेशिक पक्षांनी मारलेली मुसंडी पाहता एप्रिलमध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये या प्रादेशिक पक्षांचा वरचष्मा असेल. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला. नाही म्हणायला हिमाचल प्रदेश आणि आसाम ही राज्ये हाती आहेत. मात्र बडी राज्ये गमावल्याने राज्यसभेतील संख्याबळ स्थिर ठेवण्याची डोकेदुखी भाजपपुढे आहे. कॉंग्रेसचीही वाट चांगलीच खडतर आहे.
महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसचे संख्याबळ मोजकेच आहे. हीच परिस्थिती शेजारच्या गुजरातमध्येही आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण विधानसभेमध्येही काँग्रेसचे फारसे प्रतिनिधित्व नाही. या प्रमुख पक्षांच्या तुलनेमध्ये दक्षिणेत वायएसआर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, एआयएडीएमके, द्रमुक या पक्षांना राज्यसभेवर प्रतिनिधी पाठविण्याची संधी अधिक आहे. पश्चिाम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला चार जागा जिंकण्याची खात्री वाटते आहे. तामिळनाडूमध्ये दोन्ही प्रमुख प्रादेशिक पक्षांना प्रत्येकी तीन जागा जिंकण्याची अपेक्षा आहे.
कोणत्या राज्यात किती जागा?
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.