विरोधकांचे नक्राश्रू, देशाची माफी मागा; केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद

विरोधकांचे नक्राश्रू, देशाची माफी मागा; केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद
Summary

राज्यसभेत महिला खासदारांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला. यासंदर्भात 8 केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळून लावले.

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस गदारोळात सुरु आहे. राज्यसभेत महिला खासदारांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला. यासंदर्भात 8 केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळून लावले. यामध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मेघवाल, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, व्ही मुरलीधरन, अनुराग ठाकुर आणि प्रल्हाद जोशी यांनी पत्रकार परिषद घेतली.

अनुराग ठाकुर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, विरोधकांना जनतेचं हित किंवा करदात्यांचा पैसा किंवा संविधानाच्या मूल्यांची कोणतीच चिंता नव्हती. जे घडलं ते खूपच लज्जास्पद होतं. विरोधकांनी नक्राश्रू ढाळण्यापेक्षा देशाची माफी मागायला हवी. विरोधकांचे वागणे हे लाज आणणारे आणि गोंधळ माजवणारे होते असंही त्यांनी म्हटलं.

विरोधकांचे नक्राश्रू, देशाची माफी मागा; केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद
'लोकशाहीची हत्या'; विरोधकांचे संसदेबाहेर आंदोलन

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की, आम्ही दररोज चर्चेसाठी प्रयत्न केला होता. चर्चा व्हावी असाच आमचा प्रयत्न होता. पहिल्याच दिवशी जेव्हा मंत्र्यांची ओळख करून द्यायची होती तेसुद्धा झालं नाही. विरोधकांनी त्यात अडथळा आणला. विरोधकांनी देशाची माफी मागावी, आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी तयार होतो. विरोधकांनी अनेक विधेयके मंजूर करू दिली नाहीत आणि चर्चेतून पळ काढला.

विरोधकांचे नक्राश्रू, देशाची माफी मागा; केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद
कुलभूषण जाधव ISI च्या जाळ्यात कसे अडकले? पुस्तकातून खुलासा

याआधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्यसभेत काही महिला खासदारांसोबत धक्काबुक्की झाल्याचं आणि लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप केला. पेगॅसस हेरगिरी प्रकरणासह केंद्रीय कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही केली.

राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत खासदारांना मारहाण कऱण्यात आली. संसदेच्या या सत्रात देशातील 60 टक्के लोकांचा आवाज दाबला, अपमान केला. विरोधकांना जनतेचे प्रश्न उपस्थित करण्याची संधीच दिली नाही असंही राहुल गांधी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com