बुलेट ट्रेनपेक्षा आरोग्य, शिक्षणावर खर्च करा; भाजपला घरचा आहेर

Rajyasabha MP Vikas Mahatme criticizes bjp itself
Rajyasabha MP Vikas Mahatme criticizes bjp itself

नवी दिल्ली : बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 1 लाख कोटी रूपये सरकार खर्च करणार आहे. हे लाखो करोडो रूपये शिक्षण व आरोग्यावर खर्च करावेत, अशी भावना लोकांमध्ये आहे, अशा शब्दांत भाजप खासदार डाॅ. विकास महात्मे यांनी राज्यसभेत सरकारला घरचा आहेर दिला. पर्यावरणाचे सारे कायदेकानून धाब्यावर बसवून बुलेट ट्रेनचा वरवंटा फिरविला जात आहे, अशीही  भावना व्यक्त झाली.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला चार वर्षांपूवीर् घोषणा झाली. मात्र  शेतकऱयांचा तीव्र विरोध होणारा हा प्रकल्प रेटून नेण्याच्या हालचाली पुन्हा गतिमान झालेल्या असताना खुद्द भाजपच्याच अनेक खासदारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र बहुतांश सत्तारूढ खासदारांमध्ये उघड विरोध करण्याचे धाडस नाही ते डाॅ. महात्मे यांनी आज राज्यसभेत दाखविले अशी खासदारांमध्ये चर्चा आहे.
डाॅ. महात्मे यांनी मांडलेल्या प्रश्नाला सरकारकडून स्पष्ट उत्तर मिळाले नाही व रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी तर यावर मौन बाळगणेच पसंत केले. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी म्हणाले की, महात्मे यांची शिक्षण व आरोग्याबाबतची भावना सरकार समजू शकते. पण जी आजची चैन वाटते ती उद्याती गरज बनते. जपान व चीनमध्ये चाळीस वर्षांपूवीर्च बुलेट ट्रेन आली.भारतात बुलेटॉ ट्रेन यावी हे युवाकंचे स्वप्न आहे. यामुळे विकास होईल. हा मार्ग बहुतांश उन्नत (एलिव्हेटेड) व समुद्राखालून जाणारा असल्याने पर्यावरणाचीही काळजी घेतली जाणार आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये हजारो शेतकरी याविरोधात न्यायालयात गेले आहेत. त्यांच्याकडून होणारा विरोध दडपून टाकला जात आहे काय तसेच पर्यावरणाचे कायदेही धाब्यावर बसविले जात आहेत का, या प्रश्नावर अंगडी यांनी, 95 टक्के शेतकऱयांनी जमिनी देण्यास संमती दिल्याचा व महाराष्ट्रातच थोडाफार विरोध शिल्लक राहिल्याचा दावा केला. ते म्हणाले की या मार्गावर 210 गावे आहेत.1 लाख कोटी खर्च होणार असले तरी या बुलेट ट्रेनमधून प्रत्येकी 3000 रूपयांचे तिकीट काढून दररोज 36 हजार लोक प्रवास करतील. 

2022 पर्यंत रेल्वेचे विद्युतीकरण
जगातील दुसऱया क्रमांकाचे अवाढव्य जाळे असलेली भारतीय रेल्वे 2022 पर्यंत डिझेलमुक्त करून रेल्वेचे संपूर्णपणे विद्युतीकरण केले जाईल असे गोयल यांनी सांगितले. ते म्हणाले की दरवर्षी रेल्वेला केवळ डिझेलसाठी किमान 28 लाख 46 हजार 540 कोटी इतका खर्च येतो. हा पैसा वाचवण्यासाठी रेल्वेचे विद्युतीकरण गरजेचे आहे.आतापावेतो 5540 इंजिने पूर्णपणे विजेवर चालणारी परिवर्तित करण्यात आली आहेत. मागच्या पाच वर्षांत रेल्वेच्या विद्युतीकरणाची गती वाढली आहे. गतवर्षी 5200 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाले. यंदा त्यापेक्षा जास्त उद्दिष्ट ठेवले गेले आहे. याशिवाय रेल्वेच्या मोकळ्या जमिनी व पडीक जमिनींवर सौर तसेच नवीकरणीय उर्जेचाही वापर केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com