केंद्राच्या मदतीनेच परमबीर सिंग देशाबाहेर 'पळवले' गेले: संजय राऊत

केंद्राच्या मदतीनेच परमबीर सिंग देशाबाहेर 'पळवले' गेले: संजय राऊत

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काल रात्री उशीरा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. अनिल देशमुख यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर आता महाविकास आघाडीला दुसरा झटका लागला आहे. कारण अजित पवार यांच्या मालमत्तांवर आता आयकर विभागाने कारवाई सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आयकर विभागाची कारवाई सुरु झाली असून हा महाविकास आघाडीला दुसरा झटका मानला जात आहे. या सगळ्या घडामोडींवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

केंद्राच्या मदतीनेच परमबीर सिंग देशाबाहेर 'पळवले' गेले: संजय राऊत
'हॉटेलचं फुटेज दिलं, तर तोंड दाखवायला...', मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

संजय राऊत यांनी म्हटलंय की, अनिल देशमुख यांनी अटक दुर्दैवी आहे. ही अटक कायद्याला आणि नितीमत्तेला धरुन नाहीये. देशमुखांवर आरोप करणारे लोक आरोप करुन पळून गेले नाहीत तर त्यांना पळवून लावलेलं आहे. कुणीही देशाबाहेर जो पळून जातो तो केंद्रीय सत्तेच्या मदतीनेच पळून जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. एकप्रकारे नाव न घेता त्यांनी मोदींवरच निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, महासंचालक दर्जाचा अधिकारी जेंव्हा हा देश सोडून जातो तेंव्हा तो केंद्राचा पाठिंबा असल्याशिवाय पळून जाऊ शकत नाही. त्याने केलेल्या आरोपांनुसार केंद्रीय यंत्रणा अटक करतेय. चौकशी तपास होऊ शकतो मात्र, पहिल्याच भेटीत अटक करणं चुकीचं आहे. त्रास देण्याचा हा प्रकार मुद्दाम केला जातोय, असंही त्यांनी म्हटलंय.

केंद्राच्या मदतीनेच परमबीर सिंग देशाबाहेर 'पळवले' गेले: संजय राऊत
"वानखेडे मोदींच्या पुढचे निघाले"; घड्याळ, शर्ट-पँटबाबत नवाब मलिकांचा नवा दावा

पुढे त्यांनी भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर आपल्या राजकारणासाठी करत असल्याचा निशाणा साधत म्हटलंय की, भाजपचे लोक जंगलात राहतात का? त्यांच्या काहीच प्रॉपर्टी नाहीयेत का, त्यांचं सगळं वैध मार्गाने आहे का? आम्हीही केंद्रीय यंत्रणांना अनेकवेळा माहिती दिलीय मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाहीये. त्यांची बायकापोरं म्हणजे कुटुंब आणि आमची रस्त्यावर राहातता का? हे घाणेरडं राजकारण त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही आणि आज टणाटण उड्या मारणाऱ्यांना उद्या तोंड लपवावं लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

पुढे त्यांनी म्हटंलय की, दिवाळी नंतर असं करु तसं करु, म्हणणारे हे लोक घरात बाथरुममध्ये तोंड लपवून बसतील, असे गौप्यस्फोट दिवाळीनतंर होतील. हे सगळं राजकीय षड्यंत्र आहे जे मी सुद्धा भोगलंय. ज्यांच्यामुळे भाजप सरकार सत्तेवर आलं नाही त्या सगळ्यांना त्रास दिला जातोय. जे बळी पडत नाहीये त्याना त्रास दिला जातोय. मात्र कितीही त्रास दिला तरी त्यांचं सरकार सत्तेत येणार नाही, असाही दावा त्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com