Rahul Gandhi
Rahul GandhiTeam eSakal

अन्नदात्याने सत्याग्रह करत अहंकाराला झुकवलं - राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला.
Published on

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना (Farmers Protest) होणाऱ्या विरोधानंतर आज केंद्र सरकारने अखेर कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ही घोषणा केली असून, लवकरच त्यांनी याबद्दल संविधानीक प्रक्रिया पुर्ण करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर देशभरातून याबद्दल वेगवेळ्या प्रतिक्रिया समोर येत असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज या निर्णयानंतर शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

Rahul Gandhi
"हा शेतकऱ्यांचा विजय आहे", मोदींच्या घोषणेवर मलिकांची प्रतिक्रिया

"देशाच्या शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहासमोर अहंकारला झुकवलं आहे. अन्यायाच्या विरोधात झालेल्या या विजयाच्या शुभेच्छा! जय हिंद, जय हिंद का किसान" असं म्हणत राहूल गांधी यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. राहुल गांधी यांनी आपला एक जुना व्हीडिओ शेअर करत या भावना मांडल्या आहेत. या व्हीडिओमध्ये राहुल गांधी म्हणताय की, "माझे शब्द लक्षात ठेवा की सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागेल." त्यामुळे आता त्यांनी हा कायदा मागे घेतल्यानंतर राहुल गांधींकडून या शेतकऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं.

Rahul Gandhi
काय होते 3 कृषी कायदे आणि आक्षेप? जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी हा निर्णय घेतला. देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूनानक जयंतीचं औचित्य साधून देशवासीयांची माफी मागत हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com