आफ्रिदी काश्मीरबाबत योग्यच बोलला : राजनाथसिंह

Shahid Afridis that statement is right says Rajnath Singh
Shahid Afridis that statement is right says Rajnath Singh

नवी दिल्ली : पाकिस्तानबाबत माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने जे विधान केले ते योग्यच आहे. त्यांना पाकिस्तान सांभाळता येत नाही. काश्मीर काय सांभाळणार ? काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि तो राहणारच, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला आज (गुरुवार) पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. 

काही दिवासांपूर्वी शाहीद आफ्रिदीने लंडनमध्ये बोलताना पाकिस्तानला घरचा आहेर दिला. त्यावेळी आफ्रिदी म्हणाला, "पाकिस्तानला काश्‍मीर नको आहे आणि तो भारतालाही देऊ नका. पाकिस्तानला त्यांचे चार प्रांत सांभाळता येत नाहीत. तसेच आता काश्‍मिरींना स्वतंत्रच राहू द्या. त्यामुळे किमान मानवता जिवंत राहील. कोणाला मरू देऊ नका'', असे तो म्हणाला होता. याबाबतचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

त्यानंतर आता राजनाथसिंह म्हणाले, की शाहिद आफ्रिदीचे म्हणणे योग्य आहे. त्यांना पाकिस्तान सांभाळता येत नाही. काश्मीर काय सांभाळणार? काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि तो राहणारच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com