संजय राऊत यांचे पुन्हा एकदा सूचक ट्विट; पाहा काय?

Sanjay Raut
Sanjay Raut

मुंबई : लोकसभेत भाजप सरकारने मांडलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (मंगळवार) पुन्हा एकदा सूचक ट्विट केले आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की राजकारणात अंतिम काही नसते, सगळे चालत असते. राऊत यांनी हे ट्विट नेमके कोणत्या कारणाने केले आहे, यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवसेनेने भाजपच्या महत्वाकांक्षी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देत विधेयकाच्या बाजुने मतदान केले आहे. 

शिवसेनेने या विधेयकात दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. आता हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राजनीती मे अंतिम कुछ नही होता, असे राऊत म्हणत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्यात राऊत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांनी दररोज ट्विट करत भाजपला लक्ष्य केले होते. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप या पक्षांमध्ये वाद झाले होते. आता राऊत यांनी आज पुन्हा एकदा सूचक ट्विट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com