

Supreme Court
esakal
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांच्या अलीकडील टिप्पण्यांमुळे देशभरात मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला आहे. युवा वकीलांसंबंधी ‘कॉक्रोच’ या शब्दाचा वापर करून केलेल्या विधानानंतर आता पर्यावरण कार्यकर्त्यांबाबत केलेल्या टिप्पण्यांमुळेही जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणी अनेक वरिष्ठ वकील, कायदा विद्यार्थी, माजी नोकरशाह आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी मुख्य न्यायाधीशांना खुल्या पत्राद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे.