
नवी दिल्ली, ता. 03 : भारतीय संविधानात इंडिया असा उल्लेख असलेल्या ठिकाणी भारत लिहावं यासाठी संविधानात दुरुस्ती करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दखल देण्यास नकार करत याचिका फेटाळून लावली आहे. ही याचिका संबंधित मंत्रालयाकडे पाठवण्यात यावी असंही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं.
देशात लॉकडाऊन असल्यानं या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी सरन्यायाधीश एसए बोबडे यांच्या पीठाने याचिका फेटाळून लावली. सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला सवाल केला की,'जर संविधानात स्पष्ट लिहिण्यात आलं आहे की इंडियाच भारत आहे तर या प्रकरणी न्यायालयात का धाव घेतली?'
याचिकाकर्त्याने म्हटलं होतं की, इंडिया हा शब्द ग्रीक इंडिका या शब्दापासून आला आहे आणि तो हटवण्यात यावा. सातत्याने याबाबत याचिकाकर्त्यानं म्हणण मांडल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी केली नाही. शेवटी सबंधित मंत्रालयाकडे याबाबत प्रस्ताव मांडण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, संविधानात भारत असाही उल्लेख करण्यात आला आहे. India that is Bharat असं लिहिण्यात आलं आहे. तुम्ही संबंधित मंत्रालयाकडे तुमचे निवेदन द्या आणि सरकारला विचारा असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं.
याचिकाकर्त्याने संविधानात दुरुस्ती करत इंडिया शब्द काढून त्याऐवजी हिंदुस्तान किंवा भारत असं लिहण्याचे आदेश केंद्राला द्यावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने दोन जूनला सुनावणी कऱण्याचा निर्णय़ घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.