
लग्नाचं आमिष दाखवून महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी आरोपी विद्यार्थ्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आरोपी विद्यार्थ्यावर बलात्काराचा गुन्हा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला. महिला आणि आरोपी विद्यार्थी यांच्यातले संबंध हे एकमेकांच्या संमतीने होते असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. या प्रकरणात विद्यार्थ्यावर आरोप करणाऱ्या महिलेचं आधीच लग्न झालं होतं. न्यायालयाने यावर आश्चर्य व्यक्त केलं.