अयोध्येतील भूखंड गैरव्यवहारावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा; प्रियांका गांधी

जमीन गैरव्यवहारावरून काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी योगी सरकारला धरले धारेवर
अयोध्येतील भूखंड गैरव्यवहारावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा; प्रियांका गांधी

नवी दिल्ली : अयोध्येतील(ayodhya) जमीन गैरव्यवहारावरून काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी(priyanka gandhi) यांनी योगी सरकारला(yogi government) धारेवर धरले आहे. राज्य सरकारने या गैरव्यवहाराचे दिलेले चौकशीचे आदेश ही निव्वळ धूळफेक असून यामध्ये तातडीने सर्वोच्च न्यायालयाने(supreme court) हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की, ‘‘ सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत त्यात हस्तक्षेप करावा. राज्यामध्ये सत्ताधारी भाजपचे(bjp) नेते जनतेला लुटत असून, लोकांच्या श्रद्धास्थानाला धक्का पोचविण्याचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून या गैरव्यवहाराची चौकशी होणार असेल तर ती निव्वळ धूळफेक आहे असेच म्हणावे लागेल.’’

अयोध्येतील भूखंड गैरव्यवहारावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा; प्रियांका गांधी
'सतर्क आणि सावधान! मोदींच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

अयोध्येतील भूखंड लाटणाऱ्यांची चौकशी होणार

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्यदिव्य राममंदिराच्या शेजारील मोक्याच्या जागा लाटणाऱ्या भाजप नेत्यांचे नातेवाईक आणि सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश यूपी सरकारने दिले आहेत. एका इंग्रजी दैनिकाने हा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. स्थानिक आमदार, महापौर, आयुक्त, उपविभागीय न्यायदंडाधिकारी आणि पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या नातेवाइकांनी संगनमताने या जमिनी लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

अयोध्येतील भूखंड गैरव्यवहारावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा; प्रियांका गांधी
धोकादायक मिळकतीबाबत इचलकरंजी पालिका यंत्रणा सतर्क; प्रशासनाकडून सूचना

मिश्रा, उपाध्याय कोण आहेत?

या तिन्ही व्यवहारांमध्ये अनिल मिश्रा आणि ऋषिकेश उपाध्याय साक्षीदार आहेत. त्यातील अनिल मिश्रा हे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रांत कार्यवाह आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांना राममंदिर निर्माण ट्रस्टचे सदस्य बनविले होते. ऋषिकेश उपाध्याय हे अयोध्येचे महापौर असून पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निकटवर्तीय आहेत.

अशीही हेराफेरी

  1. अवघ्या दोन कोटींची जमीन ट्रस्टला २६.५० कोटी रुपयांना दिली

  2. ‘वक्फ बोर्डा’ची २.३३४ हेक्टर जमीन फरारी गुन्हेगार हरिशकुमार पाठक यांना दोन कोटी रुपयांना विकण्यात आली.

  3. १८ मार्च २०२१ ला सायं ६.५१ वाजता यातील १.०३७ हेक्टर जमीन रामजन्मभूमी ट्रस्टला, सचिव चंपतराय यांच्यामार्फत विकण्यात आली.

  4. याच दिवशी सायंकाळी ७.१० वाजता १.२०८ हेक्टर जमीन रवीमोहन तिवारी, सुल्तान अन्सारी यांना दोन कोटींना विकली.

  5. पाच मिनिटांनी म्हणजे १८ मार्चच्या सायंकाळी ७.१५ वाजता ही १.२९८ हेक्टर जमीन रवीमोहन तिवारी आणि सुलतान अन्सारी यांनी रामजन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपतराय यांना १८.५ कोटी रुपयांना विकण्याचे नोंदणीकृत करारपत्र केले आणि ट्रस्टतर्फे साडेअठरा कोटी रुपये देण्यातही आले.

अयोध्येतील भूखंड गैरव्यवहारावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा; प्रियांका गांधी
Podcast: चीननं भारताची गाढवं पळवली ते शक्ती कायदा विधेयकाला एकमतानं मंजूरी

प्रियांका म्हणाल्या

  1. अयोध्येतील गैरव्यवहारावर योगी, पंतप्रधान मोदी गप्प का?

  2. भाजप नेत्यांनी लोकांच्या श्रद्धा आणि धर्माला विकले आहे

  3. राम मंदिरासाठी गोळा केलेल्या निधीमध्येही मोठी हेराफेरी

  4. ‘राम मंदिर ट्रस्ट’च्या पैशाचा भाजप, संघाकडून गैरवापर

  5. अयोध्येतील दलितांच्या जमिनी देखील लाटण्यात आल्या

  6. मंदिराच्या निधींवर डल्ला मारणाऱ्यांना पंतप्रधानांकडून आश्रय

  7. राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये घाऊक गैरव्यवहार होतो आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com