मल्ल्याच्या तीन मुलांना भरावे लागणार 318 कोटी, जाणून घ्या काय होता स्कॅम

फरारी मद्यसम्राट विजय मल्ल्या याला सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
मल्ल्या
मल्ल्यासकाळ

नवी दिल्ली : फरारी मद्यसम्राट विजय मल्ल्या याला सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला दोन हजारांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी दोन महिने कारावास भोगावा लागणार आहे. विजय मल्ल्या मार्च 2016 पासून लंडनमध्ये असून त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज आपण न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मल्ल्याला दोषी ठरवून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे अवमान प्रकरण 40 दशलक्ष म्हणजेच सुमारे 318 कोटी रुपयांशी संबंधित आहे.

मल्ल्या याने ही रक्कम आपल्या तीन मुलांना पाठवली होती. ही रक्कम चार आठवड्यांत व्याजासह परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता ही रक्कम मल्ल्याच्या मुलांना द्यावे लागणार का? हे जाणून घेण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात काय म्हटले? त्याला समजून घेऊया..

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने विजय मल्ल्याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवून चार महिन्यांचा तुरुंगवास आणि 2 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी दोन महिने कारावास भोगावा लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, मल्ल्याला केलेल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही आणि सुनावणीदरम्यानही तो हजर झालेला नाही. त्यामुळे कायद्याचे वैभव टिकवण्यासाठी शिक्षा होणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला 4 आठवड्यांच्या आत 40 दशलक्ष डॉलर्स भरण्यास सांगितले आहे. ही रक्कम 8% व्याजासह परत करावी लागेल. मल्ल्याने असे केले नाही तर, त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

विजय मल्ल्यावर 9 हजार कोटींहून अधिक रुपयांची बँक फसवणूक केल्याचा आरोप आहे. मल्ल्या मार्च 2016 पासून यूकेमध्ये राहत आहे. त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. 2017 मध्ये, बँकांच्या एका संघाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये मल्ल्याविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नेतृत्वाखालील संघाने आरोप केला होता की, मल्ल्याने न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून त्यांच्या तीन मुलांच्या खात्यात 40 दशलक्ष हस्तांतरित केले. त्यानंतर मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवून कारवाई सुरू केली.

न्यायालयाने मल्ल्याला अनेकवेळा सुनावणीदरम्यान हजर राहण्याचे आदेश दिले, मात्र त्यांनी कारवाईत भाग घेतला नाही. त्याशिवाय या वर्षी 10 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने मल्ल्याला दोन आठवड्यांत न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते, मात्र, त्यानंतरही तो न्यायालयात हजर झाला नाही. खरे तर कर्नाटक उच्च न्यायालयाने मल्ल्या यांना कर्ज वसुलीसाठी त्यांच्या मालकीची कोणतीही मालमत्ता विकण्यास आणि हस्तांतरित करण्यास मनाई केली होती. असे असूनही, मल्ल्याने आपली काही मालमत्ता 75 दशलक्ष रुपयांना विकली आणि ही रक्कम तीन मुलांच्या नावे ट्रस्ट तयार करून ट्रन्सफर केली.

आता तिन्ही मुले रक्कम भरणार?

सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याच्या तीन मुलांना चार आठवड्यांत बँकांना 40 दशलक्ष भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सिद्धार्थ, लीना आणि तान्या ही रक्कम वार्षिक 8% दराने भरतील असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. ही रक्कम न भरल्यास किंवा काही त्रुटी राहिल्यास मालमत्ता जप्तीच्या कारवाईसह वसुलीसाठी कोणतीही कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com