सर्जिकल स्ट्राईकचा केला बाऊ; लष्करी अधिकाऱ्याचेच मत

DS Hooda
DS Hooda

नवी दिल्ली : दोन वर्षापूर्वी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा गरज नसताना बाऊ करण्यात आल्याचे, मत या कारवाईत सहभागी असलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या कारवाईत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यानंतर केंद्र सरकारने या कारवाईचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता. भारताने प्रथमच पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कारवाई केल्याचे म्हटले होते. पण, यापूर्वीही लष्कराने अशा कारवाया केल्याचे समोर आले होते. आता निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुड्डा यांनीही गरज नसताना याचा बाऊ करण्यात आल्याचे म्हटले आहे.

एएनआयशी बोलताना हुड्डा म्हणाले, ''मला वाटत नव्हते की या गोष्टीचा एवढा बाऊ करण्यात येईल. त्यावेळी लष्कराकडून काही कारवाई होणे गरजेचे होते आणि ती करण्यात आली. या कारवाईचा राजकारणासाठी वापर करण्यात आला. हे योग्य की नाही मला माहिती नाही, पण आता हे राजकारण्यांनाच विचारायले हवे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) याच मार्गाने कारवाई करावी लागते. सीमेवरील तणाव कमी होण्यासाठी आणि घुसखोरी रोखण्यासाठी पाकिस्तानला असाच अचानक धक्का द्यावा लागतो. अशा कारवाईची पुन्हा गरज पडली, तर पुन्हा अशी कारवाई करण्यात येईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com