उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारमधील कामगार मंत्री पदाचा राजीनामा देणारे स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. एवढंच नाही तर यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी करत एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. मौर्य यांनी भाजपसोबतच (BJP) बसपावरही जोरदार टीका केली आहे. कधीकाळी ते मायावतींच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते, स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले, 'आम्ही ज्यांची साथ सोडतो, नंतर ते कुठेच उरत नाही. त्याचं जिवंत उदाहरण मायावती आहेत.
आंबेडकरांच्या कार्यातून मायावतींनी माघार घेतली. मान्यवर कांशीराम यांनी डोळे मिटताच त्यांच्या घोषणा बदलण्यात आल्या. 'जिसकी जितनी भागीदारी, उसकी उतनी हिस्सेदारी' हा नारा बदलून 'जिसकी जितनी तैयारी, उसकी उतनी भागीदारी' असा केला.राजीनाम्यांमुळे भाजप नेत्यांची झोप उडाली...
स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, आज भारतीय जनता पक्षाचे जे बडे नेते कुंभकर्णी झोपेत होते, त्यांची झोप आमच्या राजीनाम्याने उडाली आहे. भाजपचे काही लोक म्हणतात की, 5 वर्षे राजीनामा का दिला नाही. मुलाच्या हितासाठी भाजप सोडल्याचेही काही बेईमान लोक सांगतात. अशा लोकांना मी सांगू इच्छितो की, भाजपच्या लोकांनी या देशातील गरीब, दलित, मागासलेल्या, अल्पसंख्याकांच्या डोळ्यात धूळफेक करून सत्ता बळकावली. इतकंच नाही तर मागासलेल्या समाजाचा नेता म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारे स्वामी म्हणाले, 'मी पक्ष काढला नसला तरी मी कोणत्याही पक्षापेक्षा कमी नाही.'
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.