स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे पहिले राज्य

स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे पहिले राज्य

नवी दिल्ली- स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे पहिले राज्य बनले आहे. दिल्लीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. केजरीवाल सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केल्याचे मानले जात आहे. 

केजरीवाल सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी आज (ता.06) अधिकृत ट्विट करून ही माहिती दिली आहे. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार, शेतकऱ्यांना आता हमीभाव मिळेल.

दिल्ली राज्यात शेतकऱ्यांची संख्या जवळपास 39000 इतकी छोटी असली तरी हा निर्णय मात्र मोठा असल्याचे बोलले जात आहे. या राज्यात एकूण 75000 ते 80000 एकर एवढी शेती आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळेल व उत्पादन वाढेल अशी शक्यता वर्वण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com