T20 World Cup Ind vs Namibia : मोठ्या विजयाचे भारताचे ध्येय; नामिबियाविरुद्ध अभिषेक शर्मा मुकण्याची शक्यता
बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना दडपणाचे ओझे दोन्ही संघांवर समान असते. जेव्हा कमजोर संघासमोर तगडा संघ उभा असतो, तेव्हा दडपण कमजोर नव्हे, तर तगड्या संघावर जास्त असते.
नवी दिल्ली - भारत वि. नामिबिया क्रिकेट सामना असे कानावर पडल्यावर मनात उत्सुकता निर्माण होत नाही, पण जेव्हा हाच सामना टी-२० विश्वचषकातील सामना आहे असे कळते, तेव्हा त्याचे महत्त्व निर्माण होते.