नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी गैरव्यवहाराची प्रकरणे आणि कर्जबुडव्यांवर प्रभावीपणे कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी दिले.
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या कामगिरीचा आढावा जेटली यांनी घेतला. जेटली म्हणाले, की बॅंकांनी कर्जे देताना नियमांचे पालन करावे. गैरव्यवहाराची प्रकरणे आणि कर्जबुडव्यांवर प्रभावीपणे कारवाई करावी. बॅंकांवर टाकण्यात आलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवावा. भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याने आठ टक्के विकासदर गाठणे शक्य झाले. अवसायन व दिवाळखोरी कायदा, वस्तू व सेवाकर (जीएसटी), नोटाबंदी आणि डिजिटल व्यवहारामुळे अर्थव्यवस्थेची प्रगती होत आहे.
बॅंक ऑफ बडोदा, विजया बॅंक आणि देना बॅंकेच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज बैठक झाली. थकीत कर्जांच्या वसुलीसाठी बॅंकांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचा मुद्दाही आजच्या बैठकीत मांडण्यात आला.
बॅंकांकडून थकीत कर्जांची वसुली
(आकडे कोटी रुपयांमध्ये)
एप्रिल ते जून 2018 : 36,551
आर्थिक वर्ष 2017-18 : 74, 562
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.