काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंग; ५ महिन्यांत १३ जणांची हत्या, काश्मिरी पंडित संतप्त

13 killed in Kashmir Valley in 5 months
13 killed in Kashmir Valley in 5 months13 killed in Kashmir Valley in 5 months

काश्मीरच्या खोऱ्यात हिंदू अल्पसंख्याकांच्या टार्गेट किलिंगच्या घटना थांबत नाही आहे. मंगळवारी (ता. ३१) कुलगाममधील शाळेच्या परिसरात घुसून दहशतवाद्यांनी जम्मूमधील शिक्षिका रजनी बाला यांची गोळ्या घालून हत्या (Murder) केली. या घटनेनंतर काश्मिरी पंडित पुन्हा एकदा भडकले आहेत. ते आंदोलन करीत आहे. काही दिवसांपूर्वी बडगाममधील चदूरा येथे काश्मिरी पंडित राहुल भट यांचीही तहसील कार्यालयात घुसून हत्या केली होती. (13 killed in Kashmir Valley in 5 months)

रजनी बाला (रा. सांबा, जम्मू) ही हिंदू होती. ती नुकतीच बागान परिसरात असलेल्या शाळेच्या आवारात पोहोचली होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार (Murder) केला. रजनी बाला यांना २०११ मध्ये कुलगाममध्ये एससी-एसटी कोट्यात दाखल करण्यात आले होते. हत्या केलेल्या ठिकाणाजवळ नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच दहशतवाद्यांचा शोध सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.

13 killed in Kashmir Valley in 5 months
असदुद्दीन ओवैसी संतापले; म्हणाले, काहीही करा, ज्ञानवापी मशीदच राहील

रजनी बाला यांच्या कुटुंबात आता नवरा राज कुमार आणि मुलगी आहे. बाला कुटुंब बऱ्याच दिवसांपासून कुलगाम जिल्ह्यात राहत होते. रजनी बाला यांच्या हत्येने सहकारी खूप दु:खी आणि संतापले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून स्थलांतरित मजूर, अल्पसंख्याक हिंदू किंवा लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या मुस्लिम समुदायातील लोकांना लक्ष्य करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

पाच महिन्यांत १३ जणांची हत्या

पाच महिन्यांत टार्गेट किलिंगमध्ये १३ जणांची हत्या (Murder) करण्यात आली तर १० जण जखमी झाले आहेत. दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्यांमध्ये चार सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यात तीन मुस्लिम समुदायातील आहेत. याशिवाय सहा स्थानिक मुस्लिमही आहेत. यामध्ये पंच, सरपंच आणि टीव्ही कलाकारांचा समावेश आहे.

13 killed in Kashmir Valley in 5 months
देशात शिक्षण उद्योग झालाय; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

काश्मिरी पंडितांचे आंदोलन तीव्र

रजनी बाला यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांचा संताप (Kashmiri Pandit angry) उसळला आहे. राहुल भट यांच्या हत्येपासून हिंदू समाजातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी पाठवण्याची मागणी होत आहे. राहुल भट यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडित समाजाचे लोक रस्त्यावर आले. या लोकांनी भाजप आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. इतकंच नाही तर राहुल भटच्या कुटुंबीयांनी प्रशासनावर आरोप केला होता की, त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं असतं तर ही घटना घडली नसती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com