
राजस्थानमध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेस सरकारच्या सर्व मंत्र्यांनी काल राजीनामे दिले. मुख्यमंत्री गेहलोत यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीनंतर हे राजीनामे घेण्यात आले असून, त्यानंतर राज्यात मोठं राजकीय घमासान सुरू झालं आहे. सरकारमध्ये मोठे फेरबदल होणार असून, काही नवीन लोकांना संधी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यातच आता काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी या घडामोडींवरून आपली प्रतिक्रीया दिली आहे.
राजस्थानमध्ये यापूर्वी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली होती, त्यावेळी सचिन पायलट हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये सामील होतील अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र सचिन पायलट यांची राहुल गांधी आणि प्रियंका गांधींशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं सांगितलं. त्यातच आता काँग्रेस मंत्रिमंडळात होणाऱ्या फेरबदलावरून पायलट यांनी, "काँग्रेस सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. पक्षात कोणतीही गटबाजी नसून, एकत्रितरीत्या सर्व निर्णय घेतले जात आहेत" असे सांगितले.
दरम्यान, आपण दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. गेल्या 20 वर्षात पक्षाने माझ्यावर दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपण निष्ठेने पार पाडल्या. आगामी काळात पक्ष मला जी जबाबदारी देईल ती आपण पुर्ण करू असे सचिन पायलट यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.