जीवाला धोका असल्याने भारतात परतणार नाही : नीरव मोदी

जीवाला धोका असल्याने भारतात परतणार नाही : नीरव मोदी

नवी दिल्ली : भारतात परतण्यास मी इच्छुक नाही. कारण तेथे माझ्या जीवाला धोका आहे, अशा शब्दांत पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गैरव्यवहारातील मुख्य आरोपी नीरव मोदी याने भारतात परतण्यास नकार दिला आहे. नीरव मोदीचे हे म्हणणे त्याच्या वकिलाने न्यायालयात मांडले आहे.   

पीएनबीमध्ये सुमारे 13 हजार 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर ईडीने नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच हे दोघांनी भारताबाहेर पलायन केले. त्यांना भारतात परत आणण्यासाठी ईडीकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर आता नीरव मोदीने त्याच्या वकिलामार्फत आपले म्हणणे मांडले. ''माझ्या जीवाला भारतामध्ये धोका आहे. त्यामुळे मी भारतात परतण्यास इच्छुक नाही. होळीच्या दिवशी माझ्या पुतळ्याचे दहन केले होते. ते मी पाहिले. विविध माध्यमातून मला वारंवार धमकावले जात आहे. त्यामुळे भारतात माझ्या जीवाला धोका असून, भारत माझ्यासाठी सुरक्षित जागा नाही'', असे नीरव मोदीने सांगितले. 

दरम्यान, कोट्यवधींचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्यालाही भारतात परत आणण्यासाठी ईडीकडून प्रयत्न केले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com