Kunal Ghosh : पक्षीय राजकारणात नेताजींपेक्षा ममता यशस्वी! तृणमूल काँग्रेसच्या नेत्याचे वादग्रस्त विधान; विरोधकांकडून टीकास्त्र

Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि ममता बॅनर्जी यांच्या राजकीय यशाची तुलना केली. या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून विरोधकांनी त्यावर टीका केली आहे.
Mamata Banerjee
Kunal Ghoshsakal
Updated on

कोलकता : तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि ममता बॅनर्जी यांच्यात तुलना केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. वेगळा पक्ष स्थापन करत पक्षीय, संसदीय राजकारणात ममता बॅनर्जी यांना यश मिळाले आणि ही बाब नेताजींनाही जमली नाही, असा दावा घोष यांनी केला. १९३९ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com