मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये शुक्रवारी इंदौर देवास रोडवर तब्बल ४० तास वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत अडकल्यानं तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोघांना हृदयविकाराचा झटका तर एका रुग्णाचा रुग्णालयात पोहोचण्याआधी ऑक्सिजन संपल्यानं मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुनावणीवेळी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं धक्कादायक असा युक्तिवाद उच्च न्यायालयात केला.