४० तास वाहतूक कोंडी, तिघांचा मृत्यू; हायकोर्टात NHAI म्हणाले, कामाशिवाय घरातून लवकर का निघता?

Traffic on High way : इंदौर देवास महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत दोघांचा हृदयविकाराने तर एकाचा रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपल्यानं मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणीवेळी एनएचएआयने अजब युक्तिवाद केला.
traffic
trafficsakal
Updated on

मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये शुक्रवारी इंदौर देवास रोडवर तब्बल ४० तास वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत अडकल्यानं तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोघांना हृदयविकाराचा झटका तर एका रुग्णाचा रुग्णालयात पोहोचण्याआधी ऑक्सिजन संपल्यानं मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुनावणीवेळी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं धक्कादायक असा युक्तिवाद उच्च न्यायालयात केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com