वाहतूक नियम मोडल्यास चार हजारांचा दंड - केजरीवाल

arvind kejriwal
arvind kejriwal

नवी दिल्ली - दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या ‘सम-विषम’ योजनेतून गणेशातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज जाहीर केले. नियमाचे पालन न करणाऱ्यांकडून ४ हजाराचा दंड वसूल केला जाईल, असेही त्यांनी संगितले.

राजधानीत ४ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत अमलात येणाऱ्या या योजनेबाबत केजरीवाल यांनी अंतिम घोषणा केली. या योजनेतून महिला, दिव्यांग तसेच दुचाकीचालकांना वगळण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना ‘सम-विषम’मधून सूट दिली असली तरी विद्यार्थ्यांना शाळेत सोडून रिकाम्या परतणाऱ्या गाडीचालकांबाबत काय?, असा प्रश्‍न विचारला असता ‘शाळांमध्ये मुलांना सोडण्याची वेळ साधारण सकाळी सात ते आठ अशी असते. यामुळे या योजनेच्या काळात चालकाने आठपूर्वी घरी परतणे आवश्‍यक आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. वाहनांच्या क्रमांकातील शेवटचा अंक सम आहे की विषम यावरून ती गाडी सम किंवा विषम तारखेला रस्त्यावर येणे अपेक्षित आहे.

यांना मिळणार सूट
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, सरन्यायाधीश,  लोकसभा व राज्यसभेचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते, दिल्ली सोडून अन्य राज्यांचे मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, उपराज्यपाल,  आप्तकालीन वाहने, तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठीची वाहने, पोलिस, संरक्षण खात्याची क्रमांक असणारी वाहने.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही ‘सम-विषम’ योजनेचे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र दिल्लीच्या नायब राज्यपालांना यातून वगळण्यात आले आहे.
- केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com