sakal
टेंटुलिया (प. बंगाल) : ‘‘आसाममध्ये भाजपला विजयाची खात्री नव्हती त्यामुळे, भाजपने येथील विधानसभा निवडणुकीसाठी बाहेरून लोक आणले. आसाममधील मतदारांच्या मतांवर विजय मिळेल असा भाजपला विश्वास नव्हता,’’ असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला. एकवेळ सापावर विश्वास ठेवता येईल, पण भाजपवर नाही, असा सल्लाही उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील टेंटुलिया येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना त्यांनी दिला.