राजकारणासाठी 'भारत जोडो' यात्रेत लहान मुलांचा वापर; EC कडं कारवाईची मागणी

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाची निवडणूक आयोगाकडं कारवाईची मागणी
राजकारणासाठी 'भारत जोडो' यात्रेत लहान मुलांचा वापर; EC कडं कारवाईची मागणी
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसनं आपल्या भारत जोडो यात्रेमध्ये राजकारणासाठी लहान मुलांचा वापर केल्याचा आरोप राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं (NCPCR) केला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाई करावी तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही या आयोगानं केली आहे. (Use of Children in Congress Bharat Jodo Yatra for Politics NCPCR Demands action to EC)

राजकारणासाठी 'भारत जोडो' यात्रेत लहान मुलांचा वापर; EC कडं कारवाईची मागणी
महत्वाचं संशोधन! लक्षणं नसतानाही केवळ ब्लड टेस्टमधून होणार कर्करोगांचं निदान

NCPCR नं तक्रार दाखल करत म्हटलं की, राहुल गांधी आणि जवाहर बाल मंचाकडून राजकीय हेतूनं लहान मुलांना निशाणा बनवण्यात आलं असून त्यांना राजकीय कार्यक्रमांमध्ये सामिल करत आहेत. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ आहेत ज्यामध्ये हे दिसून येतं की, 'भारत जोडो, बच्चे जोडो' या घोषणांनी लहान मुलांना टार्गेट करण्यात आलं आहे. लहान मुलांना राजकीय अजेंड्यासह काँग्रेसच्या अभियानात सामील केलं आहे.

राजकारणासाठी 'भारत जोडो' यात्रेत लहान मुलांचा वापर; EC कडं कारवाईची मागणी
मागच्या दारानं सोनिया गांधींना पंतप्रधान बनवण्याचा भाजपचा प्रयत्न - केजरीवाल

आयोगानं असाही आरोप केला की, यामुळं निवडणूक आयोगाच्या त्या नियमांचं उल्लंघन झालं आहे, ज्यानुसार केवळ प्रौढ व्यक्तीचं राजकीय पक्षाचा भाग होऊ शकतात. NCPCR नं निवडणूक आयोगाला पत्र लिहून म्हटलं की, हे लहान मुलांच्या अधिकारांचं प्राथमिकदृष्ट्या उल्लंघन आहे. राजकीय अजेंडा पूर्ण करण्यासाठी लहान मुलांचं शोषण केलं जात आहे. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर आणि दीर्घकालिन परिणाम होऊ शकतो. त्यामुळं हा प्रकार भारतीय संविधानाच्या कलम २१ विरोधात आहे. त्यामुळं या प्रकरणाच्या घटनाक्रमाची संपूर्ण चौकशी व्हावी, तसेच तक्रारीत ज्या राजकीय पक्षाचा आणि त्यांच्या नेत्याचा उल्लेख आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी.

राजकारणासाठी 'भारत जोडो' यात्रेत लहान मुलांचा वापर; EC कडं कारवाईची मागणी
शिवाजी पार्क वगळलं? आता 'या' ठिकाणी होणार शिंदे गटाचा दसरा मेळावा

दरम्यान, काँग्रेसनं तळागळातील संपर्क मजबूत करण्याच्या उद्देशानं 'भारत जोडो' यात्रा सुरु केली आहे. ७ सप्टेंबरपासून सुरु झालेली ही यात्रा पाच महिन्यांत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ३,५७० किमी अंतर पार करणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com