आतापर्यंत दिनेशानंदसह 9 जणांना अटक करण्यात आलीय.
गेल्या वर्षी उत्तर हरिद्वार (Haridwar) इथं झालेल्या धर्म संसदेदरम्यान भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी काली सेनेच्या दिनेशानंद भारती (Dinesh Anand Bharti) यांना अटक केलीय. भडकाऊ भाषण प्रकरणातील ही तिसरी अटक आहे.
याआधी जितेंद्र नारायण त्यागी उर्फ वसीम रिझवी (Wasim Rizvi) आणि स्वामी यती नरसिंहानंद सरस्वती यांना अटक करण्यात आलीय. या संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) लक्ष ठेवून आहे.
न्यायालयाच्या कठोरतेचा परिणाम म्हणजे, बुधवारी भगवानपूर येथील डाडा जलालपूर इथं होणाऱ्या हिंदू महापंचायतीला (Hindu Mahapanchayat) पोलीस (Police) प्रशासनानं परवानगी नाकारलीय. एसपी कुमार यांनी सांगितलं की, भडकाऊ भाषण प्रकरणी आरोपी दिनेशानंद भारतीला अटक करण्यात आलीय. बुधवारी काली सेनेचे निमंत्रक दिनेशानंद भारती यांनी महापंचायतीची घोषणा केली होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केलीय.
नोव्हेंबर 2021 मध्ये खडखरीतील वेद निकेतनमध्ये धर्म संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या धर्म संसदेत असभ्य भाषणं झाली. उत्तर प्रदेश युवा मंडळाचे माजी अध्यक्ष जितेंद्र नारायण त्यागी उर्फ वसीम रिझवी आणि यती नरसिंहानंद यांना अनुचित भाषण केल्याबद्दल अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलंय. यती नरसिंहानंद जामिनावर बाहेर आले आहेत, तर जितेंद्र नारायण सिंह त्यागी अजूनही तुरुंगात आहेत. दरम्यान, 16 एप्रिल रोजी भगवानपूरमधील जलालपूर गावात हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) काढण्यात आलेल्या मिरवणुकीत झालेल्या हिंसक चकमकीनंतर आता जिल्हा प्रशासन पूर्णत: सतर्कतेनं सामोरं जात आहे. याचवेळी भडकाऊ भाषण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत दिनेशानंदसह 9 जणांना अटक करण्यात आलीय.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.