
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारताने या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं होतं. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लष्कराने सीमेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. मात्र दोन्ही देशांनी आता शस्त्रसंधी केलीय. पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीनंतर भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींची माहिती दिली. यात भारतीय नौदलाच्या व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद यांना विचारण्यात आलं होतं की, पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली तर काय? यावर एएन प्रमोद यांनी पाकिस्तानला आता समजलंय की भारत काय करू शकतो असं उत्तर दिलं.