शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘असत्याची फॅक्टरी’ उरेल; ममता बॅनर्जी

mamta-banerjee
mamta-banerjee

पारा (पश्‍चिम बंगाल) - ‘केंद्र सरकार सरकारी कंपन्या विकत आहे आणि शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘असत्याची फॅक्टरी’ केवळ उरेल,’’ असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केला. पुरुलिया जिल्ह्यात तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रचारसभेत बोलताना त्या म्हणाल्या की बंगालमधील जनतेला भाजप आश्‍वासने देत आहे, पण आसाम आणि त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यातील आश्‍वासने पूर्ण करण्यात भाजप अपयशी ठरली आहे.

ईशान्येकडील या दोन्ही राज्यांत भाजप सरकारने हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले आहे, असा दावा करीत सर्व केंद्रीय संस्था बंद करण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. शेवटी एकच संस्था उरेल जी नरेंद्र मोदी यांच्या खोटेपणाची आणि भाजपच्या धोकेबाजीची आहे, असे  ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाहेरच्या गुंडाना मत देऊ नका
अन्य प्रचारसभेप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी येथेही चंडी पाठ मंत्र म्हणत जातीय राजकारणाला थारा न देण्याचे व ‘बाहेरील गुंडां’ना मत न देण्याचे आवाहन केले. ‘मी धमक्यांना भीत नाही आणि जर धमक्या दिल्या तर त्याला सामोरे जाईन,’ असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com