पश्‍चिम बंगालमध्ये पुढील सरकार भाजपचेच असेल : अमित शहा

amit-shah
amit-shah

नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केवळ त्यांच्या भाच्यासाठीच काम करीत असून विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्या बाजूने कोणीही नसेल, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केली. 

पश्‍चिम बंगालमधील डमरजुला स्टेडिअम येथे  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सभा झाली. त्यात शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (टीएमसी) ‘मा माटी, मानुष’ या घोषणेचा खरा अर्थ पिळवणूक, भ्रष्टाचार आणि लांगूलचालन असा असल्याचे सांगून बंगालमध्ये पुढील सरकार भाजपचेच असेल आणि राज्यात विकासाचा मार्ग खुला होईल, असा विश्‍वास शहा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपचीच सत्ता येणार आहे. मोदी सरकार जनकल्याणासाठी काम करीत असताना ममता बॅनर्जी सरकार ‘भतिजा कल्याणा’साठी काम करीत आहेत.’’ 

ममता अपयशी
‘टीएमसी’चे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत, त्याबद्दल ममता बॅनर्जी यांची आत्मपरीक्षण करावे, असा खोचक सल्ला शहा यांनी दिला. ‘‘त्या राज्यातील जनतेसाठी अपयशी ठरल्या आहेत, हे याचे कारण आहे. निवडणुकीपर्यंत त्या एकट्या पडणार आहेत,’’ असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com