पाच राज्यांच्या निकालाचा महाराष्ट्रावर काय परिणाम?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो.
5 State Assembly Election Impact on Maharashtra
5 State Assembly Election Impact on MaharashtraSAKAL

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Election Results) आज लागले. यापैकी पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये भाजपने (BJP) नंबर एकचा पक्ष ठरला. या निकालांचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही होऊ शकतो. महाविकास आघाडीसाठी (MVA) हा निकाल धोक्याची घंटा ठरू शकतो.

महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) तसेच ठाणे आणि आजुबाजूच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक लोक राहतात. या लोकांची भाजपा ही पहिली पसंती असते. महाराष्ट्रामध्ये काहीच काळामध्ये मुंबई, पुणेसह इतर काही महानगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. अशावेळी सध्याचा हा निकाल नक्कीच परिणाम करणारा ठरू शकेल. या यशाने उत्साहित झालेला भाजप नव्या दमानं निवडणूकांना सामोरा जाऊ शकतो. यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस या तिन्ही पक्षांसमोरच्या अडचणी वाढू शकतात. (Maharashtra may also be affected by the Assembly elections in five states)

5 State Assembly Election Impact on Maharashtra
उत्तर प्रदेश : गोरखपूर में का बा? बाबा बाबा!

महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचे होऊ शकतात प्रयत्न-

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार पाडण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप सातत्याने भाजपवर झाला आहे. या निकालानंतर भाजप अधिक आक्रमकपणे सरकारमधील तिन्ही पक्षांना घेरण्याचा प्रयत्न करू शकते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस यांतील असंतुष्ट नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

मुंबई महानगरपालिकेवर लागोपाठ पाचवेळा शिवसेनेचा भगवा-

मुंबई महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे निर्विदाद वर्चस्व राहिले आहे. परंतु यावेळी मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये फार फरक नव्हता. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत शिवसेनेपुढे महानगरपालिकेची सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. 1997 पासून सत्तेत असणाऱ्या शिवसेनेसाठी हे कठीण जाणार आहे. भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील जनादेशही देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या बाजूने होता. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप निश्चितच जिंकेल.

5 State Assembly Election Impact on Maharashtra
Video: भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर जल्लोष

निकालांचा महाविकास आघाडी सरकारवर परिणाम होणार नाही-

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांच्या निकालांचा महाविकास आघाडी सरकारवर परिणाम होणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता क्लाईट क्रेस्टो यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रावर या निकालाचा काही परिणाम होणार नाही. सरकार खूप चांगलं काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. तर शिवसेना प्रवक्ता मनिषा कायंडे म्हटल्या की भाजप फक्त मार्केटिंग तसेच इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये पटाईत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com