पुन्हा हल्ला झाल्यास युद्धच

पुन्हा हल्ला झाल्यास युद्धच

वॉशिंग्टन : पाकिस्तानपर्यंत धागेदोरे जाणारा 26/11 प्रमाणेच आणखी एखादा दहशतवादी हल्ला भारतावर झाल्यास युद्ध होण्याची दाट शक्‍यता असल्याचे अमेरिकेमधील तज्ज्ञांनी म्हटले आहे. मुंबईवर 26/11 ला झालेल्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.

या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद हा अद्यापही पाकिस्तानमध्ये मुक्तपणे फिरत असल्याने दहशतवाद्यांना शासन करण्याबाबत पाकिस्तान सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे. हल्ल्याच्या घटनेला दहा वर्षे पूर्ण होत आली, तरी या प्रकरणातील सातही संशयितांवर पाकिस्तानने कारवाई केलेली नाही, त्यांना ते शक्‍यही नाही, असे अमेरिकेच्या "सीआयए' या गुप्तचर संस्थेचे माजी अधिकारी ब्रुस रिडल यांनी म्हटले आहे. त्यामुळे, 26/11 प्रमाणेच आणखी एक हल्ला भारतात झाल्यास दोन देशांमध्ये युद्ध होऊ शकते, असे रिडल म्हणाले.

पाकिस्तान आणि अमेरिकेमधील तणावपूर्ण संबंध, पाकिस्तानला चीनची मदत आणि अमेरिका-चीन वाद यामुळे भारत-पाकमध्ये वाद झाल्यास त्यात अमेरिका आणि चीनही उडी घालू शकतात, असे पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी म्हटले आहे. 26/11 च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने दोषींवर कारवाई करण्याचे आणि लष्करे तोयबाला नेस्तनाबूत करण्याचे आश्‍वासन दिले होते, ते अद्यापही पाळले नसल्याचे तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com