नवी दिल्ली : ‘जल बोर्ड’ची जबाबदारी कोणाकडे

satyendra-jain
satyendra-jain

नवी दिल्ली - मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद कायम ठेवले असून, दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जल बोर्डाची जबाबदारी सत्येंद्र जैन यांच्याकडे सोपविली असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. 

शिक्षण, अर्थ, नियोजन, जमीन आणि इमारती, दक्षता, पर्यटन, सेवा, कला, संस्कृती आणि भाषा आदी विभागांची जबाबदारी असणार आहे. आपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे दिल्लीचे समन्वयक गोपाल राय यांच्याकडे पर्यावरण विभाग, तर राजेंद्र पाल गौतम यांच्याकडे महिला आणि बालविकास विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असलेल्या मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, राजेंद्रपाल गौतम, इम्रान हुसेन, गोपाल राय आणि कैलाश गेहलोत यांनीही आज दिल्लीच्या सचिवालयात आपापल्या विभागाची सूत्रे स्वीकारली.  मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर केजरीवाल यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलविली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com