
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचं जगभरात थैमान असताना सगळ्याच देशांनी कोरोनापासून बचावण्यासाठी खबरदारी घेतलेली आहे. भारतही कोरोनाविरोधात लढण्यासाठी सज्ज आहे. देशातील प्रत्येक राज्यात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून कोरोनावरील उपाय सुचविण्याचेही आवाहन केले आहे व योग्य उपायाला १ लाख रूपयांचे बक्षिसही जाहीर केले आहे. याचीच दखल जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने घेतली आहे व भारतात कोरोनाबाबत घेतल्या जाणाऱ्या काळजीचे जगात कौतुक होत आहे.
जगात पसरलेल्या कोरोनामुळे अनेक देशातील शहरे, वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर भारतात इतर देशांतून येणारी वाहतूकही काही प्रमाणात बंद ठेवण्यात आली आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या १४८ वर पोहोचली असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, भारतात कोरोना मोठ्या प्रमाणात पसरण्यापूर्वीच भारत सरकारने व प्रत्येक राज्यातील सरकारने योग्य ती खबरदारी घेतली आहे. याचीच दखल जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी हेन्क बेकेनडॅम यांनी भारत घेत असलेल्या खबरदारीचं कौतुक केलं आहे.
कोरोनाबाबतीत भारत सरकारने घेतलेले निर्णय आणि सुरू असलेली अंमलबजावणी याने मी प्रभावित झालो. त्यांच्या या कामामुळे भारत अजून तरी कोरोनाला रोखण्यात यशस्वी झाला आहे. प्रत्येक यंत्रणा काम करत आहे हे बघून छान वाटतंय. भारताकडे संशोधन क्षमता चांगली आहे. आयसीएमआर आणि आरोग्य विभागाकडे आरोग्यसंदर्भात संशोधनाची क्षमता ही कौतुकास्पद आहे. या विभागांनी कोरोनाच्या विषाणूंवर संशोधन करायला सुरवात केली आहे, त्यामुळे भारत आता संशोधन देशांमध्ये गणला जाईल, असे बेकेनडॅम यांनी सांगतिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.