
नवी दिल्ली : गलवान खोऱ्यातील सैनिकांचे मृत्यू ही भारत-चीन सीमेवर गेल्या ४५ वर्षांत झालेली पहिलीच घटना असताना भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष थांबणार की हा संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर येणार हा प्रश्न आहे. अशातच समोरासमोर उभ्या ठाकलेल्या उभय बाजूच्या सैनिकांमध्ये कोणत्याही क्षणी ठिणगी पडून या भागातील स्थिती आणखी खालावण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर या भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांनी १९९३ मध्ये केलेल्या करारानुसार या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशा घटनांत अग्निशस्त्रांचा वापर न करण्याचे ठरले आहे. गलवान खोऱ्यातील घटनेमुळे या कराराबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे लडाखमध्ये उभय बाजूच्या सैनिकांच्या माघारीच्या प्रक्रियेलाही आता मोठी खीळ बसली आहे.
जर सैन्य माघारीची प्रक्रिया जलद गतीने पार पडली नाही, तर गलवानमधील घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त आहे. समोरासमोर उभे ठाकलेल्या सैनिकांमध्ये तणाव, संतापाची भावना अधिक असते. एखादी लहानशी घटनाही संघर्षांची ठिणगी टाकण्यासाठी पुरेशी ठरू शकते असे काही तज्ञांचे मत आहे.
दरम्यान, चीनचा गलवान खोऱ्यावरील दावा भारताने फेटाळून लावला असला तरी चीनकडून सातत्याने गलवान खोरे आमचेच असल्याचा दावा केला जात आहे. यासंबंधी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी काल (ता. २१) सकाळी एकापाठोपाठ एक आठ टि्वट केले. या टि्वटमध्ये त्यांनी गलवान खोऱ्याचा भाग चीनचा कसा आहे? हे सांगताना सोमवारी तिथे घडलेल्या रक्तरंजित संघर्षासाठी भारताला जबाबदार धरल्याने हा संघर्ष आणखी चिघळणार असल्याचेच दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.