उत्तर प्रदेशमध्ये अजब घटना घडली आहे. राज्यातील हरदोई येथील तरुणाने बायको पळून गेल्याची पोलिसात तक्रार केली आहे. पत्नी औषध घेण्यासाठी गेल्याचे सांगून ३ एप्रिल रोजी दोन मुलींसह घरातून निघून गेली होती. तेव्हापासून ती परतली नाही. ती तिच्या प्रियकरासह पळून गेली, अशी माहिती तरुणाने पोलिसांना दिली त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नवऱ्याला औषघ घेण्यासाठी जात असल्याचे सांगूण महिलेने पळ ठोकला. प्रियकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेने नवऱ्याची फसवणूक केली. यावेळी महिला दोन मुलींना देखील घेऊन गेली. बराच वेळ झाला बायको घरी न आल्याने नवऱ्याने शोधाशोध सुरू केली. मात्र नवऱ्याला बायको पळून गेल्याचे कळाल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो अजूनही बायको आणि मुलींचा शोध घेत आहे.
बायको आणि मुलांचा शोध घेण्यासाठी नवऱ्याने पोलिसांत तक्रार देखील दिली आहे. हे प्रकरण हरदोई शहर पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. या प्रकरणी पोलीस देखील शोध घेत आहेत.
बायको औषध घेण्यासाठी जात असल्याचे सांगून ३ एप्रिल रोजी मुलींसह घरातून पळून गेली. तेव्हापासून ती परतली नाही. घरात ठेवलेले ३० हजार रुपये किमतीचे दागिनेही बायको घेऊन गेल्याचे नवऱ्याने पोलिसांना सांगितले. (crime news)
यावेळी नवऱ्याने मुझफ्फरनगरच्या खेतौली गावात राहणाऱ्या उमेश उर्फ कल्लूवर बायकोचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला आहे. कल्लूसोबत बायकोचे प्रेमसंबंध असल्याचे देखील त्याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.