बेळगावातील सुवर्णसौधमध्ये नोव्हेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन

बेळगावातील सुवर्णसौधमध्ये नोव्हेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन

बंगळूर - बेळगावातील सुवर्णसौधमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्याची राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अधिवेशन घेण्यात येणार असून ते पाच दिवस चालणार आहे.

दरम्यान, म्हादई व कावेरी आंदोलकांवरील सर्व खटले मागे घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

राज्यातील युती सरकारने उत्तर कर्नाटकावर अन्याय केल्याची भावना जनतेच्या मनात आहे. हा रोष कमी करण्यासाठी सरकारने बेळगावमध्ये अधिवेशन घेऊन उत्तर कर्नाटकाच्या विकासावर चर्चा घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पाच दिवस अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी आवश्‍यकता वाटल्यास ते १० दिवसांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

म्हादई प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी अनेक शेतकऱ्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कावेरी नदी पाणी वाटपप्रश्‍नी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनावरील खटलेही मागे घेण्यात येणार आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com