मतदानानंतर लगेच भाजपकडून 'या' मंत्र्यांची हकालपट्टी

bjp
bjp

लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असे वक्तव्य करणारे एनडीएतील घटकपक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांची लोकसभेचे मतदान संपल्यानंतर लगेच मंत्रिमंडळातून हकालपट्टी  करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश सरकारमध्ये राजभर यांच्याकडे मागासवर्ग कल्याण आणि दिव्यांग कल्याण मंत्री अशी जबाबदारी होती. उत्तर प्रदेशचे मुख्यंमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ओमप्रकाश राजभर यांना मंत्रिमंडळातून तत्काळ प्रभावाने बरखास्त करावे, अशी शिफारस राज्यपाल राम नाईक यांच्याकडे केली होती. त्यानंतर राज्यापालांनी राजभर यांना पदमुक्त केले. दरम्यान, राजभर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच उत्तर प्रदेशात गरिबांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.

राजभर यांनी अनेकवेळा वादग्रस्त विधाने करून भाजपाला वारंवार अडचणीत आणण्याचे काम केले होते. त्यामुळे अखेर लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर मुख्यंमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ओमप्रकाश राजभर यांच्यावर कारवाई केली आहे. ओमप्रकाश राजभर यांनी लोकसभा निवडणुकीत घोसीसह एकूण दोन जागांची मागणी केली होती. भाजपाने त्यांना घोसी येथून तिकीट देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र राजभर यांनी भाजपाच्या तिकीटावर लढावे, अशी अट घालण्यात आली. मात्र त्याबाबत राजभर यांनी नकार दिला होता. सातव्या टप्प्यातील मतदानानंतर उत्तर प्रदेशात भाजपचा दारुण पराभव होईल, तसेच सपा-बसपा आघाडीला विजय मिळेल, असे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच त्यांनी मिर्झापूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com