लखीमपूर खिरी घटना: योगी सरकारने दाखल केलं प्रतिज्ञापत्र

लखीमपूर घटनेतील साक्षीदारवर झालेला हल्ला वैयक्तिक वादातून असल्याचं सरकारने म्हंटलंय.
lakhimpur kheri
lakhimpur kherisakal

लखीमपूर खिरी घटनेतील साक्षीदारावर झालेला हल्ल्याचा आरोप योगी सरकारने नाकारलाय. होळीदरम्यान वैयक्तिक वादातून हा हल्ला झालेला असल्याचं उत्तरप्रदेश सरकारने म्हंटलयं. लखीमपूर खिरी घटनेतील पिडीत आणि साक्षीदारांना सुरक्षा पुरविली जात असुन,सुरक्षा मुल्यांकन देखील करण्यात येतंय. तसेचं पीडीत आणि साक्षीदार त्यांना मिळणाऱ्या सुरक्षेबद्दल समाधानी असल्याचं देखील सुप्रीम कोर्टासमोर सांगितलंय. आरोपी आशिष मिश्रा यांच्या जामीनाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान उत्तरप्रदेश सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. (Lakhimpur Khiri incident)

lakhimpur kheri
दुचाकीचालकांचं भांडण, माजी कबड्डीपटूला भोकसले

आरोपी आशिष मिश्रा हा केंद्रिय राज्यमंत्र्याचा मुलगा आहे. आरोपी आशिष मिश्रा याच्या जामीनाविरोधात सरकारने भूमिका घेतली असल्याचंही म्हंटलय. १६ मार्चला आशिष मिश्रा यांच्या जामिनाविरोधात सुप्रीमकोर्टात दाखल याचिकेसंदर्भात उत्तरप्रदेश सरकारला नोटीस पाठविली होती. आरोपी आशिष मिश्रा जामीनावर बाहेर येताच साक्षीदारावर हल्ला झाला होता.

मुख्य न्यायाधीश एन वी रमणा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या खंडपीठाने लखीमपूर खिरी घटनेतील पीडीत आणि साक्षीदारांना पूर्ण सुरक्षा देण्याबाबत आदेश दिले होते. १० फेब्रुवारीला अलाहाबाद हायकोर्टाने आरोपी आशिष मिश्राला जामीन दिला होता.

३ ऑक्टोबर २०२१ रोजी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने भरधाव वेगाने गाडी घातली होती. यात अनेक शेतकऱ्यांचा आणि पत्रकाराचा मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com