टिप्स : अकरावीच्या प्रवेशाची तयारी

आता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागेल. परंतु त्याअगोदरच प्रवेश प्रक्रियेची ‘परीक्षा’ मुलांना आणि पालकांना द्यावी लागणार आहे.
Admission
AdmissionSakal
Summary

आता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागेल. परंतु त्याअगोदरच प्रवेश प्रक्रियेची ‘परीक्षा’ मुलांना आणि पालकांना द्यावी लागणार आहे.

आता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागेल. परंतु त्याअगोदरच प्रवेश प्रक्रियेची ‘परीक्षा’ मुलांना आणि पालकांना द्यावी लागणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काही तयारी करावी लागणार आहे. संपूर्ण प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार असल्याने ती समजून घेतली पाहिजे. प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश मिळणार नाही याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक.

प्रवेश अर्ज भरण्यासाठी तो दोन भागांत विभागला गेलेला आहे. विद्यार्थी नोंदणी महत्त्वाची १. प्रवेश अर्ज, २. पर्याय स्वीकारण्याचा अर्ज. त्यातील भाग १ हा निकाल लागण्यापूर्वी भरणं गरजेचं आहे. आपल्या शाळेतून किंवा उपलब्ध ऑनलाइन पोर्टलवरून भाग १ भरता येणार आहे. त्यासाठी आपण आपल्या शाळेत जाऊ शकता किंवा प्रवेशासाठीच्या केंद्रांवर जाऊनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. भाग १ महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना तो अग्रक्रमाने, आत्ताच भरणे आवश्यक आहे. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या व्यतिरिक्त इतर बोर्डाच्या परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आपल्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे.

भाग १ मध्ये विद्यार्थ्याच्या नावाच्या नोंदणी बरोबर दहावीला ज्या शाळेमधून प्रविष्ट झालो आहोत त्या शाळेविषयी, आपल्या स्वतःबद्दल काही वैयक्तिक माहिती यात भरणे आवश्यक आहे. त्यासाठीचा ॲटोमॅटिक जनरेटेड लॉग इन आय.डी. आपल्याला मिळणार आहे आणि पासवर्ड जो आपण तयार करून भरावा लागणार आहे. हे दोन्ही प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तसेच फॉर्म अपलोड करताना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. यात

  • दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला

  • परीक्षा गुणपत्रिका

  • जातीचा दाखला (वडिलांचा, स्वतःचा)

  • उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबद्दलचा दाखला

हे अपलोड करावे लागणार आहे म्हणूनच ते सॉफ्ट आणि हार्ड अशा दोन्ही प्रकारे तयार ठेवणं गरजेचं आहे. प्रवेशासाठी दहावी किंवा इतर समकक्ष परीक्षा इंग्रजी सहित किमान पाच विषय घेऊन उत्तीर्ण असण्याची आवश्यकता आहे. मार्गदर्शन केंद्रावरून आपण आपला पहिला भाग बरोबर असल्याबद्दल तपासणी करून तो प्रमाणित करून घेणं आवश्यक आहे.

भाग १ भरून तपासून ओके झाल्याशिवाय आणि निकाला नंतरच तुम्हाला भाग २कडे वळता येईल. ज्यात आपल्याला कमीत कमी एक किंवा १० कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यायांची पसंती देता येईल. त्यासाठी लागणारे कट ऑफ वगैरे पाहून तयार ठेवणं आवश्यक. अर्थात हे सर्व निकाल लागल्यानंतरच. तूर्तास नाव नोंदणी आणि भाग १ भरायला सुरुवात करा. या सर्व प्रक्रियेसाठी शुभेच्छा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com