पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या सोमवारपासून (ता. १९) मुख्य परीक्षा सुरू होत आहेत. यामध्ये इयत्ता दहावीची संस्कृत विषयाची परीक्षा आहे. त्याच वेळी, इयत्ता बारावीची हिंदी विषयाची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल.
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचावे असा सल्ला ‘सीबीएसई’ बोर्डाने दिला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाताना शेवटच्या क्षणी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रवेशपत्र आणि महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
मुख्य परीक्षेबाबत काही विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, परीक्षेचा ताण दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्यानाचा अवलंब करावा, योगासने करावीत तसेच सोशल मीडियापासून दूर राहावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
मार्गदर्शक सूचना...
परीक्षेच्या वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे
प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही
परीक्षा कक्षामध्ये लिखाण साहित्याची देवाण-घेवाण करण्याची परवानगी नाही
परीक्षाकक्षामध्ये कोणतेही अनधिकृत साहित्य आणू नका
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.