जुलैमध्ये बेरोजगारीच्या दरात घट, पण शहरांची स्थिती खेड्यांपेक्षा वाईट : अहवाल

जुलैमध्ये शहरी भागातील रोजगार सहा लाखांनी कमी झाला आहे.
Job
JobSakal

CMIE Report On Unemployment Rate : पावसाळ्यात वाढलेल्या कृषी कामांमुळे जुलैमध्ये देशातील बेरोजगारीचा दर 6.80 टक्क्यांवर आला असून, एक महिन्यापूर्वी म्हणजेच जूनमध्ये हा दर 7.80 टक्के इतका होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी संस्थेने (CMIE) जुलै 2022 चा डेटा जारी करताना बेरोजगारीच्या दरात घट झाल्याचा दावा केला आहे. मात्र, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात बेरोजगारी वाढली असल्याचे यात नमुद करण्यात आले आहे.

Job
राष्ट्रवादीचा नाम जप करू नका, रुपाली ठोंबरेंचा टिळकांच्या शैलीत बंडखोरांना टोला

CMIE च्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर जूनमध्ये 8.03 टक्क्यांच्या तुलनेत गेल्या महिन्यात 6.14 टक्क्यांवर घसरला आहे. त्याच वेळी शहरी भागातील बेरोजगारीचा दर महिन्यापूर्वी 7.80 टक्क्यांवरून 8.21 टक्क्यांवर पोहोचला आहे. उद्योग आणि सेवा क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्यामुळे शहरी भागातील बेरोजगारी वाढल्याचे यात म्हटले आहे.

शहरी भागात सहा लाखांनी रोजगार झाला कमी

CMIE च्या मासिक अहवालानुसार जुलैमध्ये शहरी भागातील रोजगार सहा लाखांनी कमी झाला आहे. जूनमधील 12.57 कोटी शहरी रोजगाराच्या तुलनेत जुलैमध्ये ही संख्या 12.51 कोटींवर आली आहे. सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास म्हणाले की, महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर रोजगारामध्ये अंशतः सुधारणा झाली आहे. जूनमध्ये रोजगार 1.3 कोटींनी कमी झाला आहे, तर जुलैमध्ये 63 लाख नोकऱ्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

Job
लग्नाचा हक्क हा मूलभूत मानवाधिकार; Online लग्नाला HC ची परवानगी

औद्योगिक क्षेत्रातील दोन लाख नोकऱ्या आणि सेवा क्षेत्रातील 28 लाख नोकऱ्या गेल्यामुळे शहरी बेरोजगारीचा दर 8.21 टक्के वाढल्याचे व्यास यांनी सांगितले. यापूर्वी जूनमध्ये औद्योगिक क्षेत्रात 43 लाख आणि सेवा क्षेत्रात 8 लाख नोकऱ्या गेल्या होत्या. अशाप्रकारे गेल्या दोन महिन्यांत उद्योग आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांतील सुमारे 80 लाख नोकऱ्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत रोजगार वाढविण्यासाठी अधिकाधिक गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे व्यास यांनी सांगितले.

Job
Al Zawahiri : 24 तासांत अल जवाहिरीच्या हत्येचा बदला, अल कायदाकडून पाकिस्तानी कमांडरची हत्या

जुलै अखेरपर्यंतची आकडेवारी दर्शवते की, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल सारख्या प्रमुख भात उत्पादक राज्यांमध्ये भात पेरणीचे प्रमाण 13 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. खरीप पिकांच्या पेरणीत सुधारणा झाल्याशिवाय ग्रामीण रोजगाराच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही. तथापि, मान्सूनच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची आशा असून, ग्रामीण रोजगारावरही त्याचा सकारात्मक परिणाम होईल असे व्यास म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com